तुझ्यात जीव रंगला मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप

Tujhyata jiva rangala malika ghetey preksakancha nirop

तुझ्यात जीव रंगला मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, ३ जानेवारी २०२१ रोजी होणार शेवटचा भाग प्रदर्शित

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत जन्मलेली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

३ ऑक्टोबर २०१६ साली मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. म्हणजे तब्बल ४ वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यामधील प्रत्येक कलाकाराला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल होतं. राणा दा, अंजली बाई, वाहिणीसाहेब, सन्नी दा ही पात्रे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील यामध्ये कोणतीही शंका नाही.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना कोल्हापूरच्या गावाचे, गावातील तालमी आणि कुस्त्यांचे दर्शन झाले. गावातील प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटू लागली. मध्यंतरी मालिकेने ट्रॅक बदलला आणि राणा दा आणि अंजली बाईंची प्रेमकहाणी एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना मालिकेतून दाखवली गेली.

हा मालिकेचा शेवटचा सप्ताह आहे. या बाबत मालिकेतील पात्र राणा दा म्हणजेच हर्षद जोशी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेज वर भावुक पोस्ट टाकली. लवकरच तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या जागेवर नवी मालिका चालू होईल परंतु प्रेक्षकांच्या मनात राणा दा, अंजलीबाई यांची लव्हस्टोरी मात्र कायम घर करून राहील

तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होणार

Tujhyat Jeev Rangala End Date

January 2021

Marathi TV Serial

Marathi Web Series

Marathi Comedy Movies