कोकणातल्या एका गावात जोतिषावर प्रचंड विश्वास असणारे अण्णा आणि त्यांच्या कुटुंबाभोवती हापूस या सिनेमाची कथा गुंफली आहे. त्यांचा भलामोठा परिवार आहे. आंब्याची बागायती करणाऱ्या अण्णांना व्यवसायाची जोखीम न उचलायची नाही. आंबा मिळेल त्या दराला विकून टाकायचा, पण आंब्यावर संशोधन करून, उत्तमोत्तम जाती तयार करून स्वत: व्यवसाय करायचा आणि आपल्या मेहनतीचा फायदा करून घ्यायचा ही त्यांच्या मुलाची महत्त्वाकांक्षा आहे.
पण एकेवर्षी लबाड दलाल आंबा विकत घ्यायला आलेला असताना काही वेगळ्याच घटना घडायला लागलेल्या असतात, आणि सिनेमाला एक वेगळीच कलाटणी मिळते.
शिवाजी साटम, अभिजित साटम, सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, आणि मुग्धा वेलणकर (दुहेरी भूमिकेत) पुष्कर श्रोत्री, विद्याधर जोशी, मृणाल देशपांडे, सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा अभिजित साटम यांनी दिग्दर्शित केला आहे.
प्राईम विडिओ वर सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.